मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jagannath Rathyatra 2024 : रथयात्रेला आजपासून सुरुवात, वाचा जगन्नाथ पुरीच्या ३ रथांची खास वैशिष्ट्ये

Jagannath Rathyatra 2024 : रथयात्रेला आजपासून सुरुवात, वाचा जगन्नाथ पुरीच्या ३ रथांची खास वैशिष्ट्ये

Jul 07, 2024 01:56 PM IST
  • twitter
  • twitter
Jagannath Rathyatra 2024 : आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीय दिवशी पुरीच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला प्रारंभ होतो. रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी कडुनिंबाच्या लाकडापासून तीन वेगवेगळे रथ तयार केले जातात. चला तर मग जाणून घेऊया या रथांचे खास वैशिष्ट्ये.  
जगन्नाथ पुरी हे भारतातील चार धामांपैकी एक आहे. इतर तीन धामांचे दर्शन घेऊन येथे यावे, असे सांगितले जाते. ओडिशा राज्यातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे वैष्णव संप्रदायाचे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे जे भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. जगन्नाथपुरीला जगाचे वैकुंठ म्हटले जाते, या ठिकाणाला शक्तिक्षेत्र, नीलांचल आणि निलगिरी असेही म्हणतात.
share
(1 / 4)
जगन्नाथ पुरी हे भारतातील चार धामांपैकी एक आहे. इतर तीन धामांचे दर्शन घेऊन येथे यावे, असे सांगितले जाते. ओडिशा राज्यातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे वैष्णव संप्रदायाचे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे जे भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. जगन्नाथपुरीला जगाचे वैकुंठ म्हटले जाते, या ठिकाणाला शक्तिक्षेत्र, नीलांचल आणि निलगिरी असेही म्हणतात.(download)
पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांनी पुरी येथे नीलमाधवाच्या रूपात अवतार घेतला होता. ओडिशामध्ये असलेले हे धाम द्वारकेप्रमाणेच समुद्र किनाऱ्यावरही वसलेले आहे. जगाचा स्वामी आपला मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासमवेत येथे विराजमान आहे. तिन्ही देवांच्या मूर्ती लाकडाच्या आहेत. दर बारा वर्ष��ंनी या मुर्तींचे पुननिर्माण होते. पवित्र वृक्षाच्या लाकडापासून मूर्तींची प्रतिकृती तयार केली जाते आणि त्यांचा पुन्हा भव्य समारंभाद्वारे अभिषेक केला जातो. वेदांनुसार भगवान हलधर हे ऋग्वेदाचे रूप आहे, श्री हरी (नृसिंह) हे सामदेवाचे रूप आहे, सुभद्रा देवी यजुर्वेदाचे रूप आहे आणि सुदर्शन चक्र हे अथर्ववेदाचे रूप मानले गेले आहे. सध्याच्या मंदिराचे बांधकाम कलिंग राजा अनंतवर्मन चोडगंगादेव यांनी सुरू केले होते.
share
(2 / 4)
पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांनी पुरी येथे नीलमाधवाच्या रूपात अवतार घेतला होता. ओडिशामध्ये असलेले हे धाम द्वारकेप्रमाणेच समुद्र किनाऱ्यावरही वसलेले आहे. जगाचा स्वामी आपला मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासमवेत येथे विराजमान आहे. तिन्ही देवांच्या मूर्ती लाकडाच्या आहेत. दर बारा वर्षांनी या मुर्तींचे पुननिर्माण होते. पवित्र वृक्षाच्या लाकडापासून मूर्तींची प्रतिकृती तयार केली जाते आणि त्यांचा पुन्हा भव्य समारंभाद्वारे अभिषेक केला जातो. वेदांनुसार भगवान हलधर हे ऋग्वेदाचे रूप आहे, श्री हरी (नृसिंह) हे सामदेवाचे रूप आहे, सुभद्रा देवी यजुर्वेदाचे रूप आहे आणि सुदर्शन चक्र हे अथर्ववेदाचे रूप मानले गेले आहे. सध्याच्या मंदिराचे बांधकाम कलिंग राजा अनंतवर्मन चोडगंगादेव यांनी सुरू केले होते.(download)
पुरीची जगप्रसिद्ध रथयात्रा आषाढ महिन्याच्या शुक्ल पंधरवड्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी कडुनिंबाच्या लाकडापासून तीन वेगवेगळे रथ तयार केले जातात. रथयात्रेत पहिले बलरामाचा रथ, मध्यभागी देवी सुभद्रा आणि शेवटी जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्णाच्या रथ असतो. बलरामाच्या रथाला तालध्वज म्हणतात जो लाल आणि हिरव्या रंगाचा असतो, देवी सुभद्राच्या रथाला दर्पदलन किंवा पद्मरथ म्हणतात जो काळा किंवा निळा रंगाचा असतो. जगन्नाथ देवाच्या रथाला नंदीघोष किंवा गरुध्वज म्हणतात ज्याचा रंग लाल आणि पिवळा असतो.
share
(3 / 4)
पुरीची जगप्रसिद्ध रथयात्रा आषाढ महिन्याच्या शुक्ल पंधरवड्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी कडुनिंबाच्या लाकडापासून तीन वेगवेगळे रथ तयार केले जातात. रथयात्रेत पहिले बलरामाचा रथ, मध्यभागी देवी सुभद्रा आणि शेवटी जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्णाच्या रथ असतो. बलरामाच्या रथाला तालध्वज म्हणतात जो लाल आणि हिरव्या रंगाचा असतो, देवी सुभद्राच्या रथाला दर्पदलन किंवा पद्मरथ म्हणतात जो काळा किंवा निळा रंगाचा असतो. जगन्नाथ देवाच्या रथाला नंदीघोष किंवा गरुध्वज म्हणतात ज्याचा रंग लाल आणि पिवळा असतो.
भगवान जगन्नाथ नंदीघोष यांचा रथ ४५.६ फूट उंच, बलरामाचा तालध्वज ४५ फूट आणि देवी सुभद्रा यांचा दर्पदलन रथ ४४.६ फूट उंच आहे. रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरात पोहोचते. हे ठिकाण देवाच्या मावशीचे घर देखील मानले जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार, याच ठिकाणी विश्वकर्मायांनी या तीन मूर्ती बनविल्या होत्या, म्हणून हे स्थान भगवान जगन्नाथाचे जन्मस्थान देखील आहे. येथे हे तीन्ही देव ७ दिवस विश्रांती घेतात. आषाढ महिन्याच्या दहाव्या दिवशी सर्व रथ पुन्हा मुख्य मंदिराच्या दिशेने निघतात. या परतीच्या प्रवासाला बहुदा यात्रा म्हणतात. जगन्नाथ मंदिरात पोहोचल्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात देवतांची पुनर्स्थापना केली जाते.
share
(4 / 4)
भगवान जगन्नाथ नंदीघोष यांचा रथ ४५.६ फूट उंच, बलरामाचा तालध्वज ४५ फूट आणि देवी सुभद्रा यांचा दर्पदलन रथ ४४.६ फूट उंच आहे. रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरात पोहोचते. हे ठिकाण देवाच्या मावशीचे घर देखील मानले जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार, याच ठिकाणी विश्वकर्मायांनी या तीन मूर्ती बनविल्या होत्या, म्हणून हे स्थान भगवान जगन्नाथाचे जन्मस्थान देखील आहे. येथे हे तीन्ही देव ७ दिवस विश्रांती घेतात. आषाढ महिन्याच्या दहाव्या दिवशी सर्व रथ पुन्हा मुख्य मंदिराच्या दिशेने निघतात. या परतीच्या प्रवासाला बहुदा यात्रा म्हणतात. जगन्नाथ मंदिरात पोहोचल्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात देवतांची पुनर्स्थापना केली जाते.(PTI)
इतर गॅलरीज